उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन
वादळवार्ता वार्तांकन – अंबाजोगाई

बीड जिल्ह्यासह केज विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.कापूस, सोयाबीन व अन्य पिके डोळ्यासमोर वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी पुर परिस्थितीमुळे पिकांसह शेतजमीनी खरडून वाहून गेल्या आहेत. बळीराजा संकटात सापडला आहे .

म्हणुन बीड जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट २५% अग्रीम पिक विमा व अनुदान जाहीर करावा.या मागणी साठी आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी मा. आमदार पृथ्वीराज साठे ,मा. आमदार संजय दौंड राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यासह शेतकरी बांधव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.