दैनिक वादळ वार्ता/केज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना उमेदवारी मिळाल्याच्या पार्श्ववभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करण्यासाठी दि. ६ एप्रिल रोजी केज येथे मुक्ताई लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, शिवसेना आणि घटक पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती..
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक जीवनराव गोरे माजी आमदार उषाताई दराडे, जिल्हाध्यक्ष आमदार संदीप भैया क्षिरसागर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, भाई मोहन गुंड, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलच्याव प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे, विधासभा प्रमुख सुरेश तात्या पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर आप्पा शिंदे, अमर देशमुख, अशोकरावजी वेडे, शंकरराव जाधव, देशमुख,, लांडगे, विष्णू घोलप, अजय बुरांडे, नितीन सोनवणे, बालासाहेब बोराडे, दत्तात्रय ठोंबरे, शिवाजी चौधरी, मुकुंद कणसे, कपिल मस्के, भाऊसाहेब गुंड, शेख शरीफ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे यांनी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन करताना म्हणाले की भाजपला हद्दपार करण्याची वेळ आलेली असून त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करून बजरंग बप्पा सोनवणे यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नेते तथा कार्यकर्त्यांना केले .
यावेळी बोलताना लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, विरोधात असताना मी काय काम केले ? असा प्रश्न सत्ताधारी उपस्थित करीत आहेत; त्यांना मी सांगू इच्छितो कि जिल्हा परिषदे मार्फत जिल्हाभरात कामे केली अन आज याठिकाणी जमलेले कार्यकर्ते माझ्या केलेल्या कामाचीच पावती आहेत . दिल्ली ते गल्ली सरकार असताना जे विकास करू शकले नाहीत त्यांनी विकासाच्या वल्गना करणे हास्यास्पद आहे विद्यमान खासदार ना डावलून उमेदवार बदलण्याची वेळ आली हाच खरा भाजपचा पराभव आहे. जिल्ह्यात कोणताही उद्योगधंदा किंवा रोजगार निर्मितीचा प्रकल्प राबवला गेलेला नाही. हे भाजपाचे अपयश आहे. मी सामान्य कुटुंबातील असताना देखील साखर कारखाना चालवून त्याद्वारे तरुणांना हाताला काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मायबाप शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात योग्य भाव देत आहे. मी निवडून आल्यास निश्चितच जिल्ह्याच्या विकासासाठी नवनवीन प्रकल्प राबवून बेकारी कमी करण्याचा प्रयत्न करीन अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर हे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिस्त आणि भूमिकेला महत्त्व असून भाजपची खोटे आश्वासने व फसव्या घोषणा याला मतदार किंमत देणार नाही. जरी भीतीने नेते पक्ष सोडून जात असले तरी सामान्य मतदार आमच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार उषाताई यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना आता विजयाची तुतारी फुंकण्याचे आवाहन केले. तर राष्ट्रवादी किसान सेलचा पूजा मोरे यांनी शेतात काबाडकष्ट करणाऱ्या सामान्यांचा कुटुंबातील मुलगा बजरंग सोनवणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!