संभाजी ब्रिगेड करणार तीव्र आंदोलन
वादळवार्ता – केज
धारूर ते आडस या मार्गावरील रस्ता अनेक वर्षापासून खराब झालेला आहे या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था या रस्त्याची झालेली असून लोकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे . हा मार्ग खुप मोठा रहदारी असल्याने याच मार्गावर शेतकरी- विद्यार्थी-विविध क्षेत्रातील कामगार -कर्मचारी तसेच वयोवृद्ध नागरिक यांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
तसेच अंबाजोगाई येथे सरकारी दवाखाना असल्याने आपात्कालीन परिस्थितीत रूग्णालयात जात असताना रुग्णांना या रस्त्यामुळे स्वतःचा जीव गमावावा लागत आहे. तसेच अंबाजोगाई येथे शाळा- -विद्यालय -काॅलेजस असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहचत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती व्हावी या करीता संभाजी ब्रिगेड धारूर तालुक्याच्या वतीने वेळोवेळी तहसील व सा.बा. विभागाकडे निवेदने दिले असता फक्त समझोता करण्यासाठी थातुरमातुर खड्डे भरण्यात आले होते, परंतु हे खड्डे भरताच अवघ्या चार पाच दिवसात पुन्हा रस्ता त्याच परिस्थितीत गेले अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. म्हणून या खडड्यांची सखोल चौकशी करून हा रस्ता येत्या पंधरा दिवसांच्या आत दुरुस्त करावा अन्यथा संभाजी ब्रिगेड किल्ले धारूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन धारूर तहसील कार्यालयाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर तालुका अध्यक्ष रमेश मोरे व संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते अंगद कोथिंबीरे यांनी दिले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!