आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

मेगा कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर ; लोकांचे जीव वाचावे म्हणून पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांनी महामार्गावर रात्र काढली जागून

वादळवार्ता – गौतम बचुटे

महामार्गाच्या पुलावर रस्त्यावर आडवे असलेले लोखंडी चॅनेलमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून साळेगांव येथील नागरिक आणि पोलीस यांनी मध्यरात्री १:०० वा. पर्यंत जागून आणि परिश्रम घेऊन तो धोकादायक लोखंडी चॅनेल जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरून हटविला. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस कर्मचारी, पत्रकार व ग्रामस्थ यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र महामार्गचे अधिकारी आणि रस्त्याचे काम करणारी मेल (मेगा इंजिनिअर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कं. मर्या.) यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने त्यांच्या विषयी प्रचंड संताप व्यक्त होत आहे.दि. ६ ऑगस्ट रोजी खामगाव-सांगोला या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८-सी या महामार्गावर केज-कळंब रस्त्यावर असलेल्या साळेगांव जवळ तेलंग आणि आरडकर यांच्या शेता जवळ असलेल्या पुलाला तडे गेल्याने लोखंडी चॅनल उघडा पडून तो रस्त्याच्या पृष्ठभागावर चार ते पाच फूट उंचीवर आडवा होता. त्यामुळे रात्री भरधाव वेगतील वाहन धडकून मोठा अपघात घडून जिवीतहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे पत्रकार गौतम बचुटे आणि काही जागरूक नागरिकांनी ही माहिती तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि रस्ते विकास महामंडळ यांना दिली.तसेच प्रताप वैरागे या वाहन चालक तरुणाने रात्री ९:०० पुलावर स्वतः वाहन चालकांचे लक्ष वेधण्यासाठी आणि अपघात घडू नये म्हणून त्या एक लाकडी काठी उभी करून त्याला एक फडके बांधले. रात्री १०:०० वा तो लोखंडी चॅनल आडवा झाल्याने पूर्ण रहदारी बंद पडली व वाहतूक तुंबली होती. सदर माहिती शरद इंगळे व दत्ता इंगळे यांनी पोलीस आणि तहसीलदार यांना फोनवरून दिल्या नंतर गावातील काही तरुण तेथे हजर झाले. त्यांनी तो आडवा चॅनेल रस्त्यावरून हटविण्याच्या प्रयत्न केला. मात्र ते शक्य होत नव्हते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. ही माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, अशोक मेसे, चंद्रकांत काळकुटे, शेख रशीद, वाहन चालक दराडे हे घटनास्थळी हजर झाले. त्या नंतर त्यांनी बॅरीकेटिंग करून एका बाजूने वाहतूक सुरू करून तुंबलेली वाहनांची गर्दी कमी केली. नंतर धोकेदायक लोखंडी चॅनेल हटविण्यासाठी मध्यरात्री १२:०० वा. अनिकेत चौरे यांना बोलावून तो चॅनेल जेसीबीच्या मदतीने काढून टाकला.

या कामी अजय वरपे, दत्ता इंगळे, पत्रकार गौतम बचुटे, अजय बचुटे, शरद इंगळे, रत्नाकर राऊत, रितेश बचुटे, लांडगे, लाड या युवकांनी मोठी मदत केली.

त्या नंतर दि. ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १:०० वा रस्ता सुरळीत झाल्याने अपघाताची शक्यता टळली.

रस्त्यावरील अडथळा हटविण्यासाठी पोलीस आणि युवकांनी रात्र अक्षरशः जागून काढली. मात्र महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळांच्या अधिकारी आणि मेल (मेगा इंजिनिअर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कं. मर्या.) यांच्या अधिकाऱ्यांनी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी संपर्क साधूनही त्यांना प्रतिसाद दिला नाही. अशा मग्रूर अधिकारी आणि मेल कंपनीवर लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी कारवाई व्हायला हवी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

यांनीही केले प्रयत्न :- रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी पत्रकार आणि युवकांनी सोशल मीडियाद्वारे माहिती देताच उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार अभिजित जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, योगेश उबाळे, संतोष मिसळे, आनंद झोटे, पोलीस निरीक्षक राजेश पाटील, राहुल खेडकर, यांच्यासह माजी पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत, माजी पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, केज येथुल औरंगाबादला बदली झालेले आणि पुरवठा अधिकारी असलेले पुरवठा अधिकारी डी सी मेंडके यांनीही अधिकाऱ्यांच्या आणि पत्रकारांच्या सतत संपर्कात राहून मदत करण्याचा प्रयत्न केला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!