Uncategorized

राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद : पावसाचा पूर्णपणे जोर ओसरला 

वादळवार्ता – कुडूत्री(प्रतिनिधी)

         राधानगरीच्या धरणांच्या एकूण स्वयंचलित सात दरवाजा पैकी पाच दरवाजे सुरू होते. राधानगरी धरण परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून सुर्यदेवतेने सुद्धा दर्शन दिले आहे. स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३ आज शुक्रवार दि २८ रोजी पहाटे ४.०४ वाजता बंद झाला.तर आज रात्री ८.०० वा ४,७ क्रमांकाचे दरवाजे बंद झाले असून पंधरा मिनिटाच्या अंतराने म्हणजेच ८.१५ वाजता ५ आणि ६ हे दरवाजे बंद झाले आहेत.पंचगंगेची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार असून कोल्हापूरकरांना दिलासा मिळणार आहे

       दरम्यान धरणाची पाणीपातळी ३४६.६४ फूट इतकी असून ८१९६.७४ द. ल.घ. फु.इतका पाणीसाठा आहे.सध्या पॉवर हाऊस मधून १४०० क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे

     काल दुपार पासून पाऊस धरण परिसरात ओसरला आहे. आज तर पूर्णपणे पाऊसाने विश्रांती घेतली पावसाचा जोर कमी झाल्याने लवकरच पूर ओसरला जाईल अशी अशा व्यक्त करण्यात येत असून पडळी, पिरळ पुलावरील पाणी कमी होताना दिसत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!