वादळवार्ता – कुडूत्री(प्रतिनिधी)
राधानगरीच्या धरणांच्या एकूण स्वयंचलित सात दरवाजा पैकी पाच दरवाजे सुरू होते. राधानगरी धरण परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून सुर्यदेवतेने सुद्धा दर्शन दिले आहे. स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३ आज शुक्रवार दि २८ रोजी पहाटे ४.०४ वाजता बंद झाला.तर आज रात्री ८.०० वा ४,७ क्रमांकाचे दरवाजे बंद झाले असून पंधरा मिनिटाच्या अंतराने म्हणजेच ८.१५ वाजता ५ आणि ६ हे दरवाजे बंद झाले आहेत.पंचगंगेची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार असून कोल्हापूरकरांना दिलासा मिळणार आहे
दरम्यान धरणाची पाणीपातळी ३४६.६४ फूट इतकी असून ८१९६.७४ द. ल.घ. फु.इतका पाणीसाठा आहे.सध्या पॉवर हाऊस मधून १४०० क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे
काल दुपार पासून पाऊस धरण परिसरात ओसरला आहे. आज तर पूर्णपणे पाऊसाने विश्रांती घेतली पावसाचा जोर कमी झाल्याने लवकरच पूर ओसरला जाईल अशी अशा व्यक्त करण्यात येत असून पडळी, पिरळ पुलावरील पाणी कमी होताना दिसत आहे.