आपले केजसामाजीक

आजच्या आठवडी बाजारातून मोबाईल चोरीला जाणार ?

दैनिक वादळवार्ता/केज

केज तालुक्यात सर्वात मोठा बाजार भरतो तो केज शहरातील शुक्रवारचा आणि मंगळवारचा आठवडी बाजार ; सदरील बाजारास केज तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी तसेच केज तालुक्यातील, शहरातील नागरिक येतात , सकाळच्या सत्रात सुरू झालेला आठवडी बाजार दुपारच्या सत्रात तुंडुब गर्दीने भरावयास सुरुवात होते ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत. यामध्ये भाजीपाला, किराणा दुकान, हॉटेल, फळविक्री आदि दुकानांची रांगेच्या- रांगा आणि खरेदी करणारे मोठया प्रमाणात ग्राहक यामध्ये लहान-थोरापासून वयोवृध्द व्यक्ति तसेच शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असतो प्रत्येकजन कांहीना कांही खरेदी करतो त्यामध्येच खरेदी करण्यात दंग असलेल्या ग्राहकांच्या गाफीलपणाचा व गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरांचा बाजारात शिरकाव होतो. कष्टाने, मेहनतीने कमवलेला व आपल्या परिवाराच्या तथा नातेवाईकांच्या संपर्कात असण्यासाठीचा मोबाईल कांही क्षणात चोरीला जातो. आणि मग सुरू होते ती त्या नागरिकाची मोबाईल शोधण्यासाठीची धडपड. सुरू होते शोधा-शोध यामध्ये प्रत्येकजन सल्ला देतो तो पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याची ; मोबाईल खरेदी केल्याची पावती घेऊन गाठावे लागते पोलिस ठाणे ज्याच्यांकडे पावती आहे त्यांचीच तक्रार घेतली जाते ज्यांच्याकडे पावती नसेल त्यांची निराशातून घर वापसी होते. मात्र मोबाईल चोर मोठ्या शिताफीने,चालाकीने, गर्दीचा फायदा घेत १०,२०,३०,४०,५० हाजाराचा मोबाईल क्षणात चोरून घेऊन फरार होतो. ज्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे त्याला प्रतीक्षा करावी लागते मोबाईल भेटण्याची, मिळण्याची ,माराव्या लागतात पोलिस ठाण्यात चकरा उत्तर दिले जाते ” अहो लोकांचे सोने , गाडया मिळत नाहीत आणि तुम्ही मोबाईल घेऊन बसलाय ” सापडल्यास कळवले जाईल.

त्या ग्राहकाच्या , नागरीकांच्या मनात नैराश्यातून प्रश्न समोर येतात ते म्हणजे ;

१) मोबाईल बाजारात घेऊन गेलो नसतो/नसते तर ?

२) बाजारात पोलिस कर्मचारी संख्येत असते तर ?

३) पोलिसांचा धाक असता तर ?

४) बाजारामध्ये पोलिस चौकी असती तर ?

५) बाजारात गेले/ गेलो नसतो तर ?

असे असंख्य प्रश्न केज तालुक्यातील तथा शहरातील मोबाईल चोरीचा शिकार झालेल्या नागरीकानंमध्ये पडलेले असताना ” या आजच्या आठवडी बाजारात किती नागरीकांचे, ग्राहकांचे मोबाईल चोरीला जातात हे पाहणे महत्वाचे ठरेल. मोबाईल चोरी जाणार कि नाही ? पोलिस कर्मचारी बाजारात गस्त मारणार कि नाही ? मोबाईल चोरांचे रॅकेट उघडकीस येणार कि नाही ? सर्व प्रश्नआर्थक चिन्ह.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!