वादळवार्ता – गौतम बचुटे
आई-वडील बाहेरगावी गेले असल्याने अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांकडे नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिचे मोटार सायकलवरून अपहरण केले. या प्रकरणी तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २३ मार्च रोजी केज तालुक्यातील पती-पत्नी हे त्यांची अल्पवयीन मुलगी व मुलाला घरी ठेवून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. एक दिवस मुक्कामी राहून ते दोघे दि. २४ मार्च रोजी ते परत गावी आले. मात्र त्यांना त्यांची मुलगी घरी आढळून आली नाही. त्यांनी मुलाकडे चौकशी केली असता त्यांच्या मुलाने सांगितले की, त्याच्या अल्पवयीन बहिणीला गावातील एका व्यक्तिने तिला मोटार सायकलीवर घेऊन गेला आहे. त्याच्या सोबत इतर दोघे होते. अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. म्हणून दि. २८ मार्च रोजी तिच्या आईच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. १८३/२०२३ भा. दं. वि. ३६३ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!