आंदोलनआपला बीड जिल्हा

मराठा आरक्षणासाठी गेलेल्या युवकाचा उष्माघाताने मृत्यू

आरक्षणाच्या महासभेसाठी गेलेल्या विलास पवार यांचा उष्माघाताने मृत्यू

वादळवार्ता/ बाळु तोडेकर/ गेवराई

उन्हाच्या झळा व वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे. मराठा आरक्षणाच्या महासभेसाठी गेलेल्या तरुणांचा परत येत असताना उष्माघाताचा पहिला बळी गेला. अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथुन परत येत असलेल्या युवकास अचानक चक्कर आली. उलट्या झाल्या उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गेवराई येथील युवा उद्योजक विलास पवार (वय ३४) असे या युवकाचे नाव आहे. वाढते तापमान व उन्हामुळे पवार यांना उष्माघाताने चक्कर आली उपस्थितांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. येथील तापमानाचा पारा सातत्याने ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. विलास पवार यांचा मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.त्यांच्यावर अंत्यसंस्कार चिंतेश्वर स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!