आपला बीड जिल्हानिवडणुक

बीड मतदार संघातील दहा ग्रामपंचायतीवर माजी मंत्री क्षीरसागर यांचे वर्चस्व

वादळवार्ता/बीड

बीड मतदार संघातील एकूण 17 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाने चांगलीच सरशी मारली आहे बीड आणि शिरूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायत वर माजी मंत्री क्षीरसागर गटाने वर्चस्व मिळवले आहे.

बीड मतदार संघातील 17 ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दहा ग्रामपंचायत मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाने विजय मिळवला असून बीड तालुक्यातील चार आणि शिरूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतच्या निकालात मोरगाव लिंबाजीराव जाधव, घोडका राजुरी बारकूबाई चंद्रसेन घोडके, लक्ष्मी आई तांडा अनिता राजेंद्र राठोड, वासनवाडी सुदामती सतीश शिंदे, पाडळी गहिनीनाथ पाखरे, हिवरसिंगा ज्योती विजय शिंदे, तागडगाव सुरेखा नवनाथ सानप,मालकाची वाडी मच्छिंद्र चव्हाण,खांबालिंबा बालाजी गित्ते,आर्वी मीरा यादव यांचा दणदणीत विजय झाला असून या ग्रामपंचायत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत जेष्ठ नेते जगदीश काळे,विलास बडगे,मुखींद लाला,ऍड शेख खाजा,सुभाष क्षीरसागर, अरुण बोगांणे,अंकुश राठोड,चंद्रकांत पेंढारे,चिमाजी वाघमारे,डॉ अरुण भस्मे यांनी केले

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!