आपला बीड जिल्हाशेतकरी

दरीत पडलेल्या माझ्या राजा बैलाला वाचवा ताईसाहेब…

धारूरच्या शेतकरीपुत्र मुंडे यांची खासदार प्रितमताई मुंडे यांना मागणी

वादळवार्ता वार्तांकन – धारूर

धारूर तालुक्यातील काटेवाडीच्या शिवारातील गावापासुन 8 किमीच्या अंतरावर दरीत पडलेल्या राज्या बैलाला आज 14 दिवस झाले बैल जाग्यावरच आहे त्यासोबत शेतकरी बालासाहेब मुंडे दिवस – रात्र बैलासोबत राहुन आपल्या राजाची काळजी घेतात.

तर शेतकरीपुत्र नामदेव मुंडे हे पाठीमागील 14 दिवसांपासुन गावचे तलाठी , धारूरचे तहसिलदार , स्थानिकचे नेते , सरपंच यांच्याकडे खेटे मारतात परंतु स्थानिक नेते, पुढारी यांच्यामार्फत वा धारूरच्या प्रशासना मार्फत कोणतीही हालचाल दिसुन आली नसलेमुळे शेतकरीपुत्राने थेट लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची केज येथे भेट घेऊन त्यांना सर्व हकीकत सांगीतली.

ताईनी केजच्या स्थानिक नेत्यांना मदत करावयाला सांगीतली होती परंतु स्थानिकच्या नेत्यानी शेतकर्‍यांला मदत करायची तर सोडाच फोन देखील उचलला नसल्यामुळे आज दि 14 नोव्हेंबर रोजी परत शेतकरीपुत्र नामदेव मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या खासदार ड़ॉ.प्रितमताई मुंडे यांना माझ्या बैलाला वाचवा ताईसाहेब अश्या स्वरूपाची भावनीक हाक दिली आहे.

गावचे सरपंच , गावचे तलाठी , धारूरचे तहसिलदार , बीडचे जिल्हाधिकरी , नेते , पुढारी ,आमदार यांनी तर शेतकर्‍याची मदत केली नाही परंतु बीड जिल्हाच्या खासदार प्रितमताई मुंडे शेतकरी बालसाहेब मुंडेना मदत करतील का ? शेतकऱ्याचा बैल वाचेल का ?  आदि प्रश्न धारुर तालुक्यातील तथा बीड जिल्हयातील नागरीकांना पडला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!